Posts

केकाण साहेब ! मुख्याधिकाऱयांच्या कार्यकाळात काय काय दडलंय ?

Image
 केकाण साहेब ! मुख्याधिकाऱयांच्या कार्यकाळात काय काय दडलंय ?  नगरपरिषद झाल्यापासून गेल्या पाचवर्षात प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी गरकळ हे नगरपरिषदेचा कारभार पहात आहेत. त्यांच्या काळात एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी रहात असेल तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे,  तसेच एव्हढ्या दिवसात त्यांनी शहरात नेमके काय काम केले, असा सवालही उपस्थित होत आहे. या पाच वर्षाच्या कार्यकाळात  जर मुख्याधिकाऱयांकडून शेवगावच्या हिताच्या दृष्टीने कामे होत नसतील तर त्यांना या पदावर कायम न ठेवता त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी का जोर धरू लागली. मुख्याधिकारी गरकळ साहेबांच्या कार्यकाळात किती निधी आला आणि तो कुठे आणि नेमका कसा खर्च झालाय हे तपासल्यानंतरच याचे कोडे  उलगडेल आणि या पाच वर्षाच्या कार्यकाळातील कारभारात 'नेमकं काय काय दडलंय', हे देखील समोर येईल, अशी अपेक्षा शेवगावकरांना आहे.  शेवगाव शहराला नगरपरिषद झाली आणि शहरवासीयांना विकासाचे स्वप्न पडले. आता शेवगावचा विकास नक्कीच होईल, अशी त्यांची भावना झाली होती.मात्र प...

मनसेसोबत आघाडीसाठी भाजपमध्ये बिघाडी

फडणवीस, आणि चंद्रकांतदादापाटील यांच्यात मतभेत फडणवीस म्हणतात एकला चलो, पाटील म्हणतात मनसेला सोबत घेऊ पुणे : मनसेसोबत युती करण्याबाबत महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रमुख दोन नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली असल्याने त्याच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे. या बाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अजूनही मनसेला सोबत घेऊन त्यांच्यासोबत युती करण्यावर ठाम आहेत. भाजपच्या या दोन प्रमुख नेत्यांमध्येच मतभेद दिसून येत असल्याने इतर नेते आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत.  भाजप-मनसे युतीचे वारे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतआहे.. पण माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर गुरुवारी ( दि. ११ ) आले असताना पुणे महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. स्वबळाची घोषणा करून काही तास उलटत नाही तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र मनसेने भूमिका बदलली तर युती शक्य असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. मनसे बाबत भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले,...

तलाठी

‘ऊंटावरुन शेळ्या हाकणे’ हा प्रकार सर्वांनाच परिचित आहे. गावागावातले तलाठी तालुक्याच्या ठिकाणी  खासगी माणसामार्फत ग्रामस्थांची कामं करतात. हा प्रकार निदर्शनास आल्यानं राज्याच्या महसूल विभागानं खास आदेश पारित केलाय. ग्रामस्थांच्या कामांसाठी यापुढे खासगी व्यक्ती अर्थात ‘झिरो तलाठी’ नेमल्यास संबंधित तलाठ्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तलाठ्यांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागत असल्यास त्यादिवसाच्या दौर्‍याची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिसेल या दृृृष्टीनं तलाठी कार्यालयातल्या सूचना फलकावर ती लिहावी. या माहितीसोबत स्वत:च्या मोबाईल क्रमांकासह सर्कल, मंडलाधिकारी आणि नायब तहसिलदारांचा मोबाईल क्रमांक द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या आदेशाने ‘झिरो तलाठी’ ठेवणार्‍या तलाठ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे तलाठ्यांना ‘ऊंटावरुन शेळ्या हाकता येणार नाहीत. कारण या ‘झिरो तलाठ्या’बद्दल ग्रामस्थांच्या प्रचंड प्रमाणात गंभीर तक्रारी आहेत. ग्रामस्थांच्या किरकोळ कामांसाठी हा ‘झिरो तलाठी’ अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करतो. पैसे न देणार्‍याला तलाठ्याविषयी चुकीची माहिती सां...